सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाकडून आदेश !

मुंबई – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडावी, याविषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल. वारीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासन आवश्यक ती उपाययोजना करेल. यंदाच्या २४ नोव्हेंबरच्या पंढरपूर कार्तिक वारीसाठी कायदा आणि सुरक्षेसाठी शासन योग्य ते नियोजन करील, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. १९ डिसेंबरला वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, समस्त वारकरी फंड दिंडी समाजाचे अध्यक्ष आदींसह वारकरी परिषद संस्थान यांचे प्रतिनिधी यांनी त्यांची भेट घेतली.
महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकर्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकर्यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा यशस्वी व्हावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. पालख्यांसाठी ३४ विश्रांतीस्थळांना कायमस्वरूपी जागेसाठी सर्वेक्षण, बसगाड्यांची सोय, पालखी मार्गावरील डागडुजी आदींच्या संदर्भातील आदेश या वेळी त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?