अंघोळ झाल्यावर केसांना तेल लावावे. केस किंचित ओले असतांना तेल लावल्यास ते चांगले लागते. तेल लावतांना ते केसांच्या मुळांना लागेल असे लावावे. यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होणे न्यून होते. सध्या पेठेत (बाजारात) तेलकटपणा नसलेली केसांसाठीची तेले मिळतात. त्यांमध्ये वनस्पती तेल नसून खनिज तेल असते. अशा तेलांचा केसांसाठी काहीही लाभ नसतो. ‘डबल रिफाइण्ड’, ‘ट्रिपल रिफाइण्ड’ यांसारखी तेलेही केसांना अपायकारक असतात. त्यांपेक्षा घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल, तिळाचे किंवा सरकीचे तेल केसांना लावावे. (संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ)
केसांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी खोबरेल तेल लावा !
नूतन लेख
- शरिरातील विविध वेगांना किंवा संवेदनांना रोखणे म्हणजे आजारांना निमंत्रणच !
- ‘पतंजलि आयुर्वेद’च्या कथित फसव्या विज्ञापनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा हिंदुद्वेष ?
- वसंत ऋतूत अधूनमधून कडुनिंब खाण्याचे आणि कडू रस ग्रहण करण्याचे कारण
- सद्गुण
- उष्णतेच्या लाटेमध्ये सर्वांनी घ्यावयाची काळजी
- सध्या चालू असलेल्या वसंत ऋतूत सब्जा कधीतरी आणि अल्प मात्रेत सेवन करणे योग्य !