अकोला येथील शेतकर्‍यांना हानीभरपाई

प्रतिकात्मक छायाचित्र

अकोला – उन्हाळ्यातील अवेळी पडलेला पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे हानी झालेल्या जिल्ह्यातील ३३ गावांतील २७२ शेतकर्‍यांच्या १९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या हानी भरपाईपोटी ४० लाख ९२ सहस्र रुपयांचे साहाय्य संमत करण्यात आले आहे.

गत वर्षभरात जिल्ह्यात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची हानी झाली होती. या हानीचे महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने संयुक्त पहाणी करून पंचनामे केले.