चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधी एकाच पंखाने उडू शकत नाही. जोपर्यंत आपण अनेक चारित्र्यवान माणसे निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत कोणत्याही राष्ट्रावर चिडण्यात आणि आरडाओरड करण्यात काही अर्थ नाही.’

– स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’)