वर्ष २००८ च्या कर्णावती येथील बाँबस्फोटांचे प्रकरण

कर्णावती (गुजरात) – येथे २६ जुलै २००८ या दिवशी लागोपाठ झालेल्या २२ बाँबस्फोटांच्या प्रकरणातील विशेष कनिष्ठ न्यायालयाचा ४ वर्षांपूर्वीचा निकाल गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला. न्यायालयाने ४९ दोषींपैकी ३८ दोषींची फाशीची शिक्षा आणि उर्वरित ११ दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती ए.वाय. कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपिठाने वर्ष २०२२ मधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालानंतर प्रविष्ट केलेल्या अपीलांवर हा निर्णय सुनावला. फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये किमान १३ जण गुजरातचे, ८ उत्तरप्रदेशचे, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथील प्रत्येकी ५, केरळ आणि कर्नाटक येथील प्रत्येकी २ आणि भाग्यनगरमधील एक जणाचा समावेश आहे.
❓2008 Ahmedabad Serial Blasts: How Long Will Justice Be Delayed?
The Gujarat High Court has upheld the death penalty for 38 terrorists and life imprisonment for 11 others in the 2008 Ahmedabad serial bomb blast case.
Yet, after 18 years, the guilty have still not faced the… pic.twitter.com/tPqBPVlUUc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 7, 2026
कर्णावती सरकारी नागरी रुग्णालय, एल्.जी. रुग्णालय, बसगाड्या, सायकली आणि चारचाकी गाड्या यांसह विविध ठिकाणी २२ बाँबस्फोट झाले होते. यांत ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण घायाळ झाले होते. एकूण २४ बाँबपैकी कलोल आणि नरोडा येथील प्रत्येकी एक बाँब फुटला नव्हता.
वर्ष २००२ मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीनंतर सूड उगवण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकण्यासाठी दोषींनी हा कट रचल्याचे सरकारी पक्षाने म्हटले होते.
सीरियाची राजधानी दमास्कस जेथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते, त्या भागात लागोपाठ ४ बाँबस्फोट : ३ जणांचा मृत्यू
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले
हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करण्यासाठी समितीचे ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’ अभियान ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
महाराष्ट्रात जलदगती न्यायालयात न्यायाधिशांची वानवा !
वर्धा येथील ‘गोरस भांडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांत वाढ ! – भाजप