राज्यातील १२ अभियांत्रिकी विद्यालये बंद होणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ने शैक्षणिक सत्र २०२५-२६ या काळात संसाधने आणि प्राध्यापक यांच्या कमतेरतेमुळे देशभरातील ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. यात महाराष्ट्रातील १२ महाविद्यालयांचा समावेश आहे. तथापि ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या महाविद्यालयांमध्ये आधीच झाले आहेत, त्यांना अर्धवट सोडले जाणार नाही.

ही कारवाई केवळ महाविद्यालय बंद करण्यापुरती मर्यादित नाही. याच काळात देशभरातील विविध तांत्रिक संस्थांमध्ये चालू असलेले ९५० हून अधिक अभ्यासक्रमही  कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. ज्या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना रस नव्हता किंवा ज्यांना चालवण्यासाठी महाविद्यालयाकडे योग्य संसाधने नव्हती, त्यांना सूचीतून वगळण्यात आले आहेत.