कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांत वाढ ! – भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.व्हाय. विजयेंद्र

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूवर वारंवार अत्याचार होत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.व्हाय. विजयेंद्र यांनी केला.  त्यांनी हावेरी जिल्ह्यातील रेट्टीहळ्ळी येथे अलीकडेच हत्या झालेले शिवाजी राव बायरोजी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना विजयेंद्र म्हणाले की, गेल्या आठवड्यात नरेगलमध्ये बैलांच्या शर्यतीच्या वेळी फटाके फोडल्याच्या कारणावरून लोहित कुरुबर आणि त्यांचे सहकारी यांच्यावर आक्रमण  करण्यात आले होते. गेल्या ६० वर्षांपासून दुकान चालवणारे शिवाजी राव यांना १०० रुपये देऊन ५०० रुपये दिल्याचा खोटा दावा करून भांडण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही केवळ वैयक्तिक घटना नाही. या हत्येमागे एक सुनियोजित कारस्थान आहे, असा आरोप विजयेंद्र यांनी केला.

येल्लापूरमध्ये ‘लव्ह जिहाद’मुळे एका हिंदु महिलेची क्रूरपणे हत्या झाली. काँग्रेस सरकारच्या अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याच्या धोरणामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळाले आहे. गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्याता धमक असेल, तर त्यांनी अशा घटनांना उत्तरदायी असणार्‍यांना पकडून कारवाई करावी, असे आव्हान विजयेंद्र यांनी दिले.