जकार्ता (इंडोनेशिया) येथील प्रवचनात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा दावा

जकार्ता (इंडोनेशिया) – श्रीराममंदिराती सध्याची परिस्थिती पहाणे कोणत्याही सनातनी व्यक्तीसाठी असाह्य आहे. श्रीराममंदिरात अशी परिस्थिती पाहून भक्तांच्या मनाला काय यातना होत असतील ?, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. लोक म्हणतात की, ‘बाबा तर काहीच बोलत नाहीत. बाबा तुम्हाला तर सर्व ठाऊक आहे, मग चिठ्ठी उघडा आणि कुणाचे नाव आहे ते सांगा.’ जर आम्ही आता चिठ्ठी उघडून नाव सांगितले, तर ते (दोषी) आम्हाला संपवून टाकतील. आज नाही, तर उद्या संपवतील; मग आम्ही इतरांची नावे सांगण्यासाठी जिवंतच रहाणार नाही; म्हणूनच काही ठिकाणी आमच्यासाठी गप्प बसणेच श्रेयस्कर असते, असे विधान बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे एका प्रवचनाच्या वेळी केले.
सध्या केवळ छोटे मासे पकडले गेले आहेत !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, भारतातील कायदा कोळ्याच्या जाळ्यासारखा आहे, ज्यामध्ये केवळ छोटे मासे अडकतात आणि मोठ्या मगरी सहज निसटून जातात. या संपूर्ण प्रकरणातील दोषींना मी चांगल्या प्रकारे ओळखतो. मी सध्या एका मोठ्या धर्मसंकटात आहेत; कारण सत्य सांगितल्यास जिवाला धोका आहे आणि शांत राहिल्यास लोक माझ्या शक्तींवर बोट ठेवतात.
बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणार्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – मुख्यमंत्री
Bihar Conversion : बिहारमध्ये मिशनरींकडून हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न !
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !