‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !

  • आगरा (उत्तरप्रदेश) येथील २ सख्ख्या बहिणींच्या धर्मांतराचे प्रकरण

  • भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये युवतींना ओढले जात होते प्रेमाच्या जाळ्यात

  • इस्लामिक स्टेटशीही संबंध

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील सदर परिसरातील २ सख्ख्या बहिणींच्या धर्मांतर प्रकरणात अटकेत असलेल्या १४ आरोपींविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज्योत्स्ना सिंह यांनी अपहरण, धर्मांतर आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असण्यासारखे गंभीर दोषारोप निश्चित केले. आरोपींनी हे आरोप फेटाळून लावत खटला चलवण्याची मागणी केली. या प्रकरणात आता ७ जुलैपासून साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया चालू होईल.

काय आहे प्रकरण ?

२४ मार्च २०२५ या दिवशी दोन सख्ख्या हिंदु बहिणी घरातून बेपत्ता झाल्या. दोघींना कोलकात्यात नेऊन त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकांनी ६ राज्यांतून २ तरुणींसह १४ आरोपींना कह्यात घेतले. अन्वेषणातून समोर आले की, धर्मांतर घडवून आणणार्‍या या टोळीची पाळेमुळे अमेरिका, कॅनडा यांसह अनेक देशांत पसरली आहेत.

पीडितेचे ‘एके-४७’ रायफलसह छायाचित्र आले समोर !

पोलिसांना या टोळीचे इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचे पुरावेही मिळाले. आरोपी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी वयाच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लव्ह जिहाद आणि इतर मार्गांनी प्रभावित करून त्यांचे धर्मांतर करत असत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश असलेल्या एका पीडितेचे छायाचित्र समोर आले. यात ती धर्मांतरानंतर ‘एके-४७’ रायफलसह दिसत आहे.

या १४ जणांच्या विरोधात आहे दोषारोपपत्र !

एस्.बी. कृष्णा उपाख्य आयेशा, रिथ बनिक उपाख्य महंमद इब्राहिम, उशामा खान, शेखर रय उपाख्य हसन अली, जुनैद कुरेशी, अबू तालिब, महंमद रहमान कुरेशी, अब्दुर रहमान, महंमद अली उपाख्य पीयूष पवार, मनोज कनोजिया उपाख्य मुस्तफा, अब्दुल रहमान उपाख्य महेंद्र पाल सिंह, जुनैद कुरेशी (द्वितीय), अब्दुल रहीम आणि अब्दुल्ला

संपादकीय भूमिका

काफिरांशी लव्ह जिहाद आणि धर्मांतर करणे, हे इस्लाममध्ये ‘पाक’, म्हणजेच पवित्र कार्य आहे. त्यामुळे जोपर्यंत देशात कठोर समान नागरी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार आणि एक दिवस येईल, जेव्हा शरीयत हीच या हिंदूबहुल देशाची राज्यघटना होऊन बसेल. त्यामुळेच जर ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इंडिया’ होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्र स्थापा !