आंबोली आणि दोडामार्ग येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाई

सावंतवाडी – आंबोली आणि दोडामार्ग येथील राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या शिकार करणार्या एकूण ८ जणांना वन विभागाच्या पथकाने १७ जूनच्या रात्री अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वेळी आरोपींकडून गावठी ठासणीची बंदूक, काडतूस बंदूक, जिवंत आणि वापरलेली काडतुसे, तलवार, विजेर्या, एक आलिशान चारचाकी वाहन आणि शिकार केलेले २ दुर्मिळ वन्यजीव आदी मुद्देमाल कह्यात घेतला.
मासुरू येथील शासकीय जंगलात सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या साळिंदर या वन्यजिवाची शिकार करून त्याला घेऊन जात असतांना विठू वाघू कोकरे (चौकुळ, सावंतवाडी) याला वन विभागाच्या पथकाने अनुमाने दीड किलोमीटर पाठलाग करून पकडले. दुसर्या कारवाईत आंबोली शिरगांवकर पॉईंट येथे जंगलात फिरणारे पवन प्रकाश देसाई, जावेद सलीम जमादार, हसीम हुसेन काजी, वनू विठ्ठल फोंड आणि आकाश मोहन कुरणे (सर्व कोल्हापूर), भरत नवलू पाटील (चौकुळ, सावंतवाडी) आणि गणेश तुकाराम पाटकर (पुणे) या ७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून मृत गेळा/पिसोरी (माऊस डिअर) आणि १ कटीदर (एशियन पाम सिव्हेट) हे वन्यजीव आणि अन्य साहित्य कह्यात घेण्यात आले. परिसरात शिकारीच्या उद्देशाने कुणी संशयास्पदरित्या फिरतांना आढळल्यास नागरिकांनी त्वरित वनक्षेत्रपाल श्री. वैभव वि. भिसे यांच्या ९५०३९७३८०२ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवननसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवणार्या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक
Lipstick Free Campus : केरळमध्ये ‘लिपस्टिक’मुक्त शाळा परिसर’ अभियानाला प्रारंभ !
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !