एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?

‘ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा या ठिकाणी दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत साहाय्यक कार्यकारी अभियंते बैकुंठ नाथ बेहरा कडून बेहिशोबी २ कोटी रुपये रोख, ३०० ग्रॅम सोने, १० सहस्र ५०० चौरस फुटांचे ४ मजली घर, भूमी आणि ५ इमारती जप्त करण्यात आल्या. एकेकाळी ६ सहस्र रुपये कमावणार्‍या बेहराने इतकी संपत्ती कशी जमवली ?, याची चौकशी आता केली जात आहे.’ (८.६.२०२६)