धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो का ?’, यावर माझा प्रश्न आहे की, तुम्ही तो घेण्यास सिद्ध आहात का ? तुम्हाला तो खरोखरच हवा आहे का ? तुम्हाला जर खरोखर हवा असेल आणि त्यासाठी जर तुम्ही यथोचित प्रयत्न कराल, तर तो प्रत्यक्षानुभव तुम्हालाही प्राप्त होईल. तसे होईल, तेव्हाच तुम्ही खरेखुरे धार्मिक बनाल. जोपर्यंत तुम्हाला असा अपरोक्षानुभव लाभत नाही, तोपर्यंत तुमच्यात आणि नास्तिकात काहीही भेद नाही. भेद असेल, तर तो एवढाच की, नास्तिक निदान प्रामाणिक असतो; परंतु जो मनुष्य ‘माझा धर्मावर विश्वास आहे’, असे म्हणतो; पण त्याची प्रत्यक्ष संधी करून घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही, तो प्रामाणिक नसतो.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)