‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील ‘दारुल उलूम देवबंद’ हे आतंकवाद्यांचे केंद्र आहे. तिथे हिंदूंना ठार मारण्याच्या रणनीती आखल्या जातात. त्यामुळे मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन करतो की, दारुल उलूम पाडण्यासाठी सर्व बुलडोझर्सचा वापर करण्यात यावा, अशी मागणी हिंदु रक्षा दलाचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी गाझियाबाद येथे सूर्या चौहान या हिंदु मुलाच्या हत्येवरून केली.