आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळ वाढवा !

(सद्गुरु) नंदकुमार जाधव

रामराज्य येण्यापूर्वी रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे. ३-४ वर्षांपूर्वी आपण कोरोना महामारीची भयावह स्थिती अनुभवली. जागतिक स्तरावरही गेले ३-४ वर्षे युद्धजन्य स्थिती आहे. तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल, ते सांगता येणार नाही. द्रष्टे संत, तसेच भविष्यवेत्ते यांनीही
आपत्काळाविषयी सांगितले आहे. एका संतांनी सांगितले की, ‘या काळात पंचमहाभूतांचे तांडव पहायला मिळेल.’ आपणही गेल्या काही वर्षांपासून बिघडलेले ऋतुचक्र अनुभवत आहोत. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे.

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था