
नवी मुंबई, २९ मे (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिका टी.टी.सी. एम्.आय.डी.सी. क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीसाठी सक्षम प्राधिकरण असल्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला या क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.
टी.टी.सी. एम्.आय.डी.सी. क्षेत्र हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येत नाही. त्यामुळे नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रासाठी महानगरपालिका कर आकारू शकत नाही. या प्रकरणी वर्ष २०१० मध्ये सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
या प्रकरणावर सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, कर आणि शुल्क या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे दोन वेळा कर आकारला जात नाही, हेही स्पष्ट झाले आहे. हे संपूर्ण क्षेत्र महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कराद्वारे जमा महसुलातून शहर विकासाची कामे केली आहेत. या माध्यमातून महानगरपालिकेस मिळणारा महसूल शहर विकासाला नवी गती देणारा असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट