डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !

ठाणे – ठाणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सकाळपासून पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. डोंबिवली परिसरात सकाळपासून रिमझिम पडणार्‍या पावसातही शिवाजी शेलार चौक परिसरात महावितरणचा विजेचा एक खांब अचानक कोसळला. या अपघातात २ दुचाकींची हानी झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबंधित यंत्रणांनी तुटलेला खांब हटवून वीजपुरवठा पूर्ववत् केला. पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटल्या. पावसाने समाधानकारक उपस्थिती लावल्याने ग्रामीण भागातील पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.