
नवी देहली – जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न अन् अविभाज्य भाग आहेत, असे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या चीन दौर्यानंतर त्यांनी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले होते की, पाकिस्तानने चीनला जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. यानंतर चीनने म्हटले की, जम्मू-काश्मीरचे सूत्र इतिहासाशी संबंधित वाद आहे आणि त्याचे निराकरण संयुक्त राष्ट्र ठरावानुसार द्विपक्षीय करारांनुसार शांततापूर्ण मार्गाने व्हायला हवे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गासारखे काही प्रकल्प भारताच्या अशा प्रदेशातून जातात, ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीर आणि बलपूर्वक नियंत्रण मिळवले आहे. भारताने अशा कोणत्याही प्रयत्नांना विरोध केला आहे, जे पाकिस्तानच्या नियंत्रणाला बळकटी देण्याचा किंवा त्याला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न करतात. चीन आणि पाक या देशांमध्ये कोणतीही सामायिक सीमा नाही. भारताने वर्ष १९६३ च्या चीन-पाकिस्तान सीमा कराराला कधीही मान्यता दिली नाही.
या करारानुसार पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोर्याचा प्रदेश चीनला दिला होता, ज्यावर त्याने वर्ष १९४८ मध्ये बेकायदेशीरपणे नियंत्रण मिळवले होते.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र