आमदार हुमायू कबीर यांचे बंगाल सरकारला आव्हान

मुर्शिदाबाद (बंगाल) – बंगालमधील भाजप सरकारने बकरी ईदच्या निमित्ताने बळी देण्याविषयी मार्गदर्शक सूचना प्रसारित करतांना, गायीसह आजारी आणि अल्प वयाच्या प्राण्यांच्या बळींवर बंदी घातली आहे. तसेच सरकारने यापूर्वीच राज्यात गोहत्या करण्यावर बंदी घातली असतांना ‘बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणारच’, अशी घोषणा येथील आमदार हुमायू कबीर यांनी केली आहे. (आमदार हुमायू यांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबावे आणि त्यांना सरळ करावे, म्हणजे ते पुन्हा असे बोलण्याचे अन् गोहत्या करण्याचे धाडस करणार नाहीत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) आमदार हुमायू हेच येथे बाबरी मशीद बांधत आहेत.
कोलकाता, पश्चिम बंगाल: AJUP के राष्ट्रीय अध्यक्ष और विधायक हुमायूं कबीर ने कहा, "…संविधान का सम्मान करना चाहिए लेकिन कुर्बानी होगी। गाय की भी होगी, बकरे की भी होगी और ऊंट की भी होगी। कुर्बानी के लिए जो पशु जायज़ हैं, उनकी कुर्बानी होंगी। बीजेपी सरकार को मैं चेतावनी देता हूं,… pic.twitter.com/hzG5DicjmC
— IANS Hindi (@IANSKhabar) May 20, 2026
आमदार हुमायू कबीर म्हणाले की, मी मख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांना थेट सांगत आहे, आगीशी खेळू नका. जर त्यांनी बळी देण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतील. बळीच्या संदर्भात मुसलमान कोणतीही तडजोड करणार नाही. बकरी ईदच्या दिवशी गायींचा बळी निश्चितच दिला जाईल; मग शुभेंदु काहीही करू देत.
“We will definitely carry out cow slaughter on Bakri Eid!” – Bengal MLA Humayun Kabir openly challenges the government.
If Hindutva leader Bal Thackeray were alive today, many would feel that he would have declared, “If anyone carries out cow slaughter on this day, Hindus should… pic.twitter.com/VcBb0LgLdh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
(म्हणे) ‘जर धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर राज्यातील वातावरण बिघडेल !’
नमाजपठणाच्या सूत्रावर सरकारने प्रसारित केलेल्या निर्देशांवरही हुमायू कबीर यांनी धमकी देत म्हटले की, जर धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर राज्यातील वातावरण बिघडेल आणि त्यास सरकारच उत्तरदायी असेल.
मुसलमान संघटनांचेही हुमायू यांना समर्थन !
आमदार हुमायू यांच्या या विधानानंतर काही मुसलमान संघटना उघडपणे हुमायू यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. ‘धार्मिक स्वातंत्र्य हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे कोणत्याही समुदायाच्या परंपरांवर बंदी घालण्याचा किंवा त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये’, असे मुसलमान संघटनांनी म्हटले आहे.
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !