गंगानदीत मांसाहारी अन्नाचा कचरा टाकल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू शकतात ! – Allahabad High Court

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – गंगानदीच्या पात्रात मांसाहारी अन्नाचा कचरा टाकल्याने हिंदु समुदायाच्या भावना दुखावू शकतात, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मार्च महिन्यात गंगानदीत एका नौकेवर इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या १४ मुसलमान पुरुषांपैकी ५ जणांना जामीन संमत करतांना न्यायमूर्ती राजीव लोचन शुक्ला यांनी हे निरीक्षण नोंदवले.

१. न्यायालयाने म्हटले की, आरोपींनी व्यक्त केलेली पश्‍चात्तापाची भावना जामीन संमत करण्यासाठी विचारात घेतली जाऊ शकते. केवळ आरोपींनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनीही समाजाला झालेल्या वेदनांबद्दल खेद व्यक्त केला आहे.

२. न्यायालयाने पुढे असेही निरीक्षण नोंदवले की, आधी आरोपींवर लावण्यात आलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षेचे प्रावधान नाही. तसेच आरोपींनी नावाड्याची नौका बळजबरीने कह्यात घेण्यासंदर्भात नावाड्याने केलेल्या तक्रारीवरही न्यायालयाने संशय व्यक्त केला. न्यायालय म्हणाले की, प्रकरण नोंदवण्यापूर्वी संबंधित नावाड्याने त्याच्यासमवेत झालेल्या खंडणी किंवा बळजबरीविषयी कोणतीही तक्रार केली नव्हती. नावाड्याने हे आरोप करण्यात केलेला विलंब त्याच्या कथेवर संशय निर्माण करतो, असे न्यायालयाने जोडले.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर ते अनेकदा निष्क्रीयच रहातात किंवा पोलीस अथवा प्रशासन यांना निवेदन देऊन झोपून जातात ! दुसरीकडे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्यास ते त्वरित ‘सर तन से जुदा’ची (शिरच्छेदाची) घोषणा करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पोलीस अन् प्रशासन तात्काळ कारवाई करत भावना दुखावणार्‍यांवर कारवाई करते !