(म्हणे) ‘तमिळनाडूतून सनातन धर्म आधीच बाहेर गेला आहे !’ – J. M. H. Aassan Maulaana

तमिळनाडूतील काँग्रेसचे नेते जे.एम्.एच्. आस्सन मौलाना यांचे संतापजनक विधान !

उदयनिधी स्टॅलिन व जे.एम्.एच्. आस्सन मौलाना

चेन्नई (तमिळनाडू) – ए.के. पलानीसामी (अण्णाद्रमुकचे नेते) बाहेर पडले आहेत (त्यांना पक्षातूनच समर्थन नाही); याचा अर्थ असा की नरेंद्र मोदीही बाहेर आहेत. (अण्णाद्रमुकने भाजपसमवेत युती केलेली आहे) आणि याचाच अर्थ असा की, तमिळनाडूतून सनातन धर्म आधीच बाहेर गेला आहे.

तमिळनाडूमध्ये सनातन धर्म कधीही फोफावणार नाही. तमिळनाडू या सर्व गोष्टींच्या पुष्कळ पुढे आहे, असे विधान काँग्रेसचे नेते जे.एम्.एच्. आस्सन मौलाना यांनी केले. द्रमुकचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षानेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातनविरोधी विधान केल्यावरून मौलाना बोलत होते.

संपादकीय भूमिका

जर हिंदु नेत्याने ‘तमिळनाडूतून इस्लामला बाहेर काढले पाहिजे किंवा इस्लाम बाहेर गेला आहे’, असे विधान केले असते, तर संपूर्ण देशात आगडोंब उसळला असता; मात्र हिंदूंना कुणीही टपली मारली, तरी ते ‘संयम’ बाळगतात, हेच यानंतर दिसून आले ! हिंदूंनी अशा घटनांत वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !