राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार्‍या काँग्रेसचा ९९ वा पराभव !

५ राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलेली माहिती

नवी देहली – नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केरळम् वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या सर्व निवडणुका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. वर्ष २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यापासून पक्ष नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. तेव्हापासून वर्ष २०२६ पर्यंत झालेल्या निवडणुकीत त्यांना सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा ९९ वा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. तेव्हापासून जवळपास सर्वच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आहे. ‘काँग्रस झालेल्या चुकांतून शिकतही नाही आणि नवी रणनीतीही बनवत नाही’, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

आता काळ स्वतःच काँग्रेसच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या राष्ट्रघातकी कृत्यांचा या पराभवांच्या माध्यमातून सूड उगवत आहे, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे. त्यामुळे काँग्रेस लवकरच इतिहासजमा होणार, हे निश्चित आहे !