मी ज्या बांगलादेशी घुसखोरांना आसाममधून हाकलतो, त्यांचे ममता बॅनर्जी बंगालमध्ये स्वागत करतात ! – Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका


कूचबिहार (बंगाल) –
मी ज्या बांगलादेशी घुसखोरांना आसाममधून हाकलतो, त्यांचे ममता बॅनर्जी बंगालमध्ये स्वागत करतात, अशा शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ते कूचबिहार येथील निवडणुकीच्या एका सभेत बोलत होते. ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगाल आणि आसाम येथे हिंदूंची संख्या उणावेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, ‘‘यंदा बंगालमध्ये भाजपचे सरकार आणायचे आहे. का आणायचे आहे ?, ते तुम्हीच (मतदारांनीच) ठरवा. मी आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांना येण्यापासून रोखले आहे. एक जरी बांगलादेशी घुसखोर आला, तरी मी त्याला त्याच दिवशी लाथ मारून बांगलादेशात हाकलून देतो.’