‘निवडणुकीनंतर ‘मिया’ समुदाय वरचढ होऊन दादागिरी करेल !’ – AIUDF Chief Badruddin Ajmal

  • आसाम विधानसभा निवडणूक २०२६

  • ए.आय.यू.डी.एफ्.चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांचे प्रक्षोभक विधान

(ए.आय.यू.डी.एफ्. म्हणजे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट) (‘मिया’ म्हणजे बांगलादेशी मुसलमान)

बदरुद्दीन अजमल

दिसपूर (आसाम) – आसाममध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ए.आय.यू.डी.एफ्.चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी प्रक्षोपक विधान केले आहे. त्यांनी ‘निवडणुकीनंतर आसाममध्ये ‘मिया’ (बांगलादेशी मुसलमान) समुदायाचा प्रभाव वाढेल’, असे म्हटले आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले होते की, गेल्या ५ वर्षांत त्यांच्या सरकारने बांगलादेशी मियांचे हात-पाय तोडले आहेत आणि पुढील ५ वर्षांत त्यांचा कणाच तोडला जाईल. मुख्यमंत्री सरमा यांनी बांगलादेशी मुसलमानांविषयी केलेल्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर अजमल यांनी वरील विधान करत आसाममध्ये बांगलादेशी मुसलमानांना मोकळे रान देण्याच्या स्वतःचा मानस व्यक्त केला आहे.

अजमल पुढे म्हणाले की, निवडणूक निकाल आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे पालटेल. आगामी काळात मिया समुदाय आसाममध्ये वरचढ ठरेल आणि त्यांचीच दादागिरी चालेल. तसेच हिमंता सरमा यांचा प्रभाव संपेल आणि त्यांना आसाम सोडून नवी देहलीला जावे लागेल.

संपादकीय भूमिका  

  • बांगलादेशी मुसलमानांसाठी आसामची दारे उघडी करणार्‍यांना मतदारांनी निवडणुकीत अद्दल घडवावी !
  • भारतीय सुरक्षेला उघडपणे आव्हान देणार्‍या अशा लोकांना आणि त्यांच्या पक्षाला निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घातली पाहिजे !