|
(ए.आय.यू.डी.एफ्. म्हणजे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट) (‘मिया’ म्हणजे बांगलादेशी मुसलमान)

दिसपूर (आसाम) – आसाममध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ए.आय.यू.डी.एफ्.चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी प्रक्षोपक विधान केले आहे. त्यांनी ‘निवडणुकीनंतर आसाममध्ये ‘मिया’ (बांगलादेशी मुसलमान) समुदायाचा प्रभाव वाढेल’, असे म्हटले आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले होते की, गेल्या ५ वर्षांत त्यांच्या सरकारने बांगलादेशी मियांचे हात-पाय तोडले आहेत आणि पुढील ५ वर्षांत त्यांचा कणाच तोडला जाईल. मुख्यमंत्री सरमा यांनी बांगलादेशी मुसलमानांविषयी केलेल्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर अजमल यांनी वरील विधान करत आसाममध्ये बांगलादेशी मुसलमानांना मोकळे रान देण्याच्या स्वतःचा मानस व्यक्त केला आहे.
अजमल पुढे म्हणाले की, निवडणूक निकाल आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे पालटेल. आगामी काळात मिया समुदाय आसाममध्ये वरचढ ठरेल आणि त्यांचीच दादागिरी चालेल. तसेच हिमंता सरमा यांचा प्रभाव संपेल आणि त्यांना आसाम सोडून नवी देहलीला जावे लागेल.
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी