उगादी (हिंदूंचे नववर्ष) आणि शिवरात्री या वेळीही मांसाहार करतो ! – Siddaramaiah

कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधानसभेत विधान

बेंगळुरू (कर्नाटक) – आजही मी राहुकाळ आणि गुलिक काळ (एक अशुभ काळ) यांवर विश्वास ठेवत नाही. यापूर्वीही मी राहुकाळ आणि गुलिक काळ यांच्या वेळी अर्थसंकल्प सादर केला आहे. माझा या गोष्टींवर विश्वास नाही. मी उगादी आणि शिवरात्री या वेळीही मांसाहार करतो. त्यात चुकीचे काय आहे ? मला देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे; परंतु देव केवळ मंदिरातच नसून सर्वत्र आहे, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत अर्थसंकल्पाच्या संदर्भातील चर्चेच्या वेळी केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर्. अशोक यांनी म्हटले होते की, सिद्धरामय्या कर्मसिद्धांताविषयी बोलतात; परंतु त्यांनी राहुकाळ दुर्लक्षित करून अर्थसंकल्प सादर केला. यावर स्पष्टीकरण देतांना सिद्धरामय्या म्हणाले , ‘‘कुटुंबीय आणि अधिकारी यांनी मला ‘अर्थसंकल्प राहुकाळात सादर करू नका’ असे सांगितले होते; परंतु मी लोकशाहीवर विश्वास ठेवत असल्याने मी तो राहुकाळातच सादर केला.’’

संपादकीय भूमिका

  • कुणी काय खावे आणि खाऊ नये ?, हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे; मात्र हिंदूंच्या नववर्षी मांसाहार करत असल्याचे सांगणे, हा हिंदूंना हिणवण्याचाच प्रकार आहे. अन्य धर्मियांविषयी सिद्धरामय्या असे विधान कधी करत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत !
  • अशांना निवडून देणार्‍या हिंदूंना याविषयी काय म्हणायचे आहे ?