वाल्मीकिऋषींनी प्रभु श्रीरामाचे चरित्र लिहिण्यामागील एक कारण !

केवळ पराक्रमी असणे, प्रतापी असणे, अत्यंत शौर्यशाली असणे एवढेच रामचंद्राचे वैशिष्ट्य नाही. ज्या ज्या सद्गुणांच्या अस्तित्वामुळे थोरपणा येतो, श्रेष्ठता प्राप्त होते, ज्या एखाद्याही गुणामुळे मनुष्य फार मोठा मानला जातो, ते सर्व सद्गुण भगवान रामचंद्राच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. अत्यंत विरक्त असलेल्या महातपस्वी वाल्मीकिऋषींना रामचंद्राचे चरित्र काव्यांतून गावे असे जे वाटले, ते त्यांच्या ठिकाणी एकवटलेल्या सद्गुण समुच्चयामुळेच ! वाल्मीकि रामायणाच्या बालकांडांतील पहिल्या सर्गातच रामाच्या गुणसमुच्चयाचे अत्यंत मनोहर वर्णन आलेले आहे.

(साभार : प.पू. स्वामी वरदानंद भारती लिखित ग्रंथ ‘मनोबोध’)