आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१६.३.२०२६)

अद्यापही सिलिंडरचा तुटवडा ! 

मुंबई – रत्नागिरी, जळगाव, रायगड या जिल्ह्यांत गॅस सिलिंडर घेण्यासाठी अजूनही रांगा लागल्या आहेत. जळगाव येथील रिक्शाचालकांच्या व्यवसायावरही गॅस मिळत नसल्याने परिणाम झाला आहे.


गिरगावमधील खानावळ बंद !

मुंबई – गिरगावमधील नरवणकर यांची १०० वर्षे जुनी प्रसिद्ध खानावळ १३ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ ५५ नोकरदार आणि विद्यार्थी या खानावळीत जात होते. खानावळीतील कर्मचार्‍यांना गावाला पाठवले असून ६५ सहस्र रुपयांची हानी झाली आहे.


लग्न सोहळ्यात चुलीवर स्वयंपाक !

सांगली – सांगली, छत्रपती संभाजीनगर येथे लग्नसोहळे चुलीवर स्वयंपाक करून साजरे हेत आहेत.


मुंबईत अल्पाहार महाग !

मुंबई – गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईत काही ठिकाणी इडली, वडे आदी सर्वत्र मिळणारे पदार्थ ५ ते १० रुपयांनी महाग झाले आहेत.