Astrologer Dr. Anil Vaidya : वर्ष २०२६-२७ मध्ये भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित होण्याची शक्यता !

आंतरराष्ट्रीय ज्योतिषभाष्यकार डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तवले भविष्य !

  • वर्ष २०२५ ते २०३२ हा काळ जगासाठी अत्यंत कठीण

  • वर्ष २०३३ पर्यंत पाकिस्तान राष्ट्र नकाशावरून पुसले जाणार !

अमरावती/नागपूर – आंतरराष्ट्रीय ज्योतिषभाष्यकार डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तवलेल्या ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषणानुसार वर्ष २०२६-२७ मध्ये भारत स्वतःला एक ‘शांतताप्रिय हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.

डॉ. अनिल वैद्य म्हणाले,

१. या कालखंडात भारताचा जगात एक ‘महासत्ता’ म्हणून मोठा प्रभाव निर्माण होईल. जेव्हा पाश्‍चात्त्य देश आणि शेजारील राष्ट्रे युद्धाच्या आगीत होरपळत असतील, तेव्हा जगाला शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी भारत पुढाकार घेईल. या पार्श्‍वभूमीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले जाणे, ही केवळ औपचारिकता नसून ती काळाची आवश्यकता ठरेल आणि जगाला भारताचा सल्ला ऐकावा लागेल.

२. सूर्यमालेतील शुभ ग्रह मानला जाणारा गुरु सध्या ‘अतिचार’ (अतिशय वेगवान) गतीने भ्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरु अशा गतीने मिथुन ते कुंभ राशीचा प्रवास करतो, तेव्हा जगात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होते. सध्या चालू असलेले रशिया-युक्रेन आणि इराण-इस्रायल युद्ध हे याच ग्रहस्थितीचे परिणाम आहेत.

३. वर्ष २०२५ ते २०३२ हा काळ जगासाठी अत्यंत कठीण आहे. या काळात अनेक देशांमध्ये आत्मकेंद्रित नेत्यांमुळे युद्धजन्य स्थिती निर्माण होऊन मोठा नरसंहार होण्याची भीती आहे.

४. वर्ष २०२९ नंतर होणार्‍या जागतिक महायुद्धात भारत अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची कामगिरी करेल.

५. या जागतिक संघर्षात पाश्‍चात्त्य देशांची मोठी आर्थिक हानी होईल; मात्र भारताला याचा प्रचंड लाभ मिळेल. भारत विकसित आणि विकसनशील देशांच्या क्रमवारीत वेगाने पुढे जाईल.

६. वर्ष २०३३ पर्यंत पाकिस्तानचे अस्तित्व पूर्णपणे खंडित होऊन ते राष्ट्र नकाशावरून पुसले जाण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

  • अशाच प्रकारची भविष्ये बिहारचे आचार्य अशोक कुमार मिश्र, तसेच अन्यही ज्योतिष शास्त्रकारांनी वर्तवली आहेत. हिंदु राष्ट्राची कावीळ झालेल्यांना मात्र अशा बातम्यांवरून अजीर्ण झाले, तर नवल नाही. मुळात वैदिक ज्योतिष जे सांगते, ते यथार्थ भविष्य असते. यामुळेच अशा उपटसुंभ पुरो(अधो)गामी हिंदुविरोधकांनी देश सोडून जाण्याचे आतापासूनच नियोजन केले, तर ते त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल !
  • ज्योतिषशास्त्राने वर्तवलेला हा भीषण आपत्काळ पहाता स्वतःच्या रक्षणासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत आध्यात्मिक बळ मिळवण्यासाठी प्रत्येकाने साधना अन् ईश्‍वरानुसंधान वाढवणे आवश्यक आहे !