नवी देहली – विवाहाच्या वेळी केवळ सप्तपदीचा विधी झाला नाही; म्हणून तो विवाह अवैध ठरत नाही, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘जोडप्याने काही विधी पार पाडल्यानंतर एकत्र रहाण्यास प्रारंभ केला आणि त्यांच्या विवाहातून एक अपत्य जन्माला आले असेल, तर तो विवाह अवैध ठरवता येणार नाही’, असे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण ?
याचिकाकर्त्याचे १९ जून २०१६ मध्ये एकमेकांना हार घालून लग्न झाले; परंतु या वेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात सप्तपदी विधी झाला नाही. त्यानंतर हे जोडपे एकत्र राहू लागले. त्यांच्या सहजीवनातून त्यांना एक मुलगीही झाली; परंतु याचिकार्त्याने असा युक्तीवाद केला की, ऑक्टोबर २०१६ पासून तो पत्नीसमेवत रहात नव्हता. त्या दोघांमध्ये सप्तपदीचा विधी झाला नसल्याने त्याने पत्नीसमेवत रहाण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याच्या पत्नीने दावा केला की, ऑक्टोबर २०१७ मध्ये तिला सासरच्या घरातून हाकलून लावण्यात आले. तसेच लग्नसोहळ्यात सप्तपदी कार्यक्रम झाला असल्याचा दावाही पत्नीने केला; परंतु या सोहळ्याची छायाचित्रे न्यायालयासमोर ठेवण्यास ती अपयशी ठरली.
काय आहे हिंदु विवाह कायदा ?
उच्च न्यायालयाने हिंदु विवाह कायदा १९५५ च्या कलम ७ अंतर्गत वैधानिक योजनेचे विश्लेषण केले. कलम ७ मधील उपकलम १ नुसार कोणत्याही विशिष्ट समारंभाचे बंधन न घालता कोणत्याही पक्षाच्या रीतिरिवाजानुसार आणि समारंभानुसार विवाह करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसेच उप कलम २ नुसार वैध विवाह स्थापित करण्यासाठी प्रत्येकवेळी सप्तपदी करणे अपरिहार्य नाही. म्हणजेच सप्तपदी हा पारंपरिक संस्कारांचा एक भाग आहे; पण हा विधी बंधनकारक नाही, असे नमूद केले.

आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी
पतीने खोटा जन्मदिनांक सांगितल्याने जन्मकुंडली जुळवण्यात चूक होणे, ही पत्नीची फसवणूक ! – Telangana High Court