असदुद्दीन ओवैसी यांचे संतापजनक विधान !

भाग्यनगर (तेलंगाणा) – टिपू सुलतान वर्ष १७९९ मध्ये ‘शहीद’ (हुतात्मा) झाले. इंग्रजांविरुद्ध लढतांना त्यांनी बलीदान दिले. टिपूंनी कारागृहात बसून तुमच्या वीर सावरकरांसारखी इंग्रजांना ६-६ प्रेमपत्रे लिहून ‘तुम्ही जे सांगाल, ते करीन’, असे सांगून क्षमा मागितली नाही. टिपू सुलतान तलवार हातात घेऊन देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी लढले आणि शहीद झाले, असे विधान ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी येथे एका कार्यक्रमात केले. मालेगाव येथील नगरपालिकेत एका कक्षात टिपूचे चित्र लावल्याच्या प्रकरणावरून त्यांनी हे विधान केले.
Selective History & Political Provocation❗
Asaduddin Owaisi claims Tipu Sultan was “martyred fighting the British” and mocks #VeerSavarkar over alleged mercy petitions.
Tipu fought to protect his own kingdom – not for India’s freedom. Why not state that clearly?
Mocking… https://t.co/uXHRBAsRLa pic.twitter.com/HEoUn47ZgW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2026
खासदार ओवैसी पुढे म्हणाले की,
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या पुस्तकात, ‘आज भारताकडे असलेले क्षेपणास्त्र आणि रॉकेट तंत्रज्ञान ही टिपूंच्या स्वप्नांची पूर्तता आहे’, असे लिहिले आहे. हे खोटे आहे का ? तसेच म. गांधी यांनी त्यांच्या ‘यंग एज’ या नियतकालिकात ‘टिपू सुलतान हे हिंदु-मुसलमान ऐक्याचे प्रतीक आहेत’, असे लिहिले होते. (म. गांधी यांच्या अशाच मानसिकतमुळे भारताची पुढे फाळणी झाली, हे ओवैसी का सांगत नाहीत ? टिपूने एकाच दिवसात १ लाख हिंदूंचे धर्मांतर केले होते, हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत ? – संपादक)
तसेच वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवर टीका करत न्यायमूर्ती कपूर आयोगाने म. गांधी हत्या प्रकरणात सावरकर यांना कटातील सहभागी म्हटले होते, असे त्यांनी नमूद केले. (न्यायालयाने या खटल्यात सावरकर यांना निर्दाेष मुक्त केले होते, हाच इतिहास आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !