‘साधना’ हाच मानवाचा खरा अलंकार !

जिवाने ईश्‍वरनिर्मित धर्माचे आचरण आणि तंतोतंत पालन करणे, म्हणजेच जिवाने त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त अशी साधना करून मिळालेल्या अमूल्य अशा मनुष्यजन्माचे सार्थक करणे.

साधनेतील ध्येय साध्य करतांना पुनःपुन्हा अपयश आले, तर काय करायचे ?

ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणे, हे ईश्‍वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे; म्हणून प्रयत्न करणे सोडू नये.’

 भगवंत भक्ताचे रक्षण करतो ! भगवंताचे भक्त बना !

कितीही मोठी आपत्ती आली, तरी भगवंताने त्याच्या भक्तांचे रक्षण केले आहे, हे सांगणारी भक्त प्रल्हादासारखी उदाहरणे आपल्याकडे आहेत. श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’

श्रीरामकृष्ण बोधामृत

ईश्‍वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.

आज मानवाला जग उद्ध्वस्त करणारी भौतिक प्रगती हवी कि जगाला चिरशांती देणारी वैदिक जीवनपद्धती हवी ?

‘खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्‍वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये नित्य तृप्तीने नांदवील.

भस्माची शिकवण

मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे.

‘संतांचा आशीर्वाद, हेच उपचार केल्याचे बिल !’, असे प.पू. दास महाराज यांना सांगणारे कुडाळ येथील नेत्रतज्ञ डॉ. संजय सामंत !

प.पू. दास महाराज यांनी त्यांना ‘देयक (बिल) किती ?, ते विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही नाही. बिलाचे पैसे शाश्‍वत टिकणार नाहीत. तुम्ही दिलेला आशीर्वाद कायमचा टिकेल ! परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भरभरून दिले.’’

मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.