परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’
‘हिंदु राष्ट्रात (ईश्वरी राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’
‘साधकाचे साधकत्व हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत असते. साधकत्व असणार्याचा प्रभाव इतरांवर लगेच पडतो.
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश’ ही पंचमहाभूते अन् निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते,
‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधू देऊ इच्छिणार्या चीनचा कावा न ओळखता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे म्हणणार्यांची कीव करावी, ती थोडीच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जीवनात कितीही मोठ्या समस्या असल्या, तरी साधक सकारात्मक राहून आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून समस्येतून बाहेर पडू शकतो.’
‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जगातील एकमेव हिंदु राष्ट्र असणार्या नेपाळला चीनमुळे साम्यवादी बनवण्यात आले. हे देशातील हिंदूंनी कदापि विसरू नये.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘वर्ष १९६२ च्या युद्धात भारताची भूमी चीनने बळकावली, हा राष्ट्रीय अपमान आहे. हे विसरणार्यांना देशात रहाण्याचा अधिकार आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले