परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येणे, असे दोन लाभ होतात. या दोन्ही लाभांमुळे आनंद अनुभवता येतो. याउलट शिकवण्यामध्ये ‘मला येते’, हा अहं वाढत जातो आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येत नाही. त्यामुळे शिकवण्याच्या भूमिकेत रहाण्यात हानी अधिक आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.९.२०२१)
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !