भारतात भ्रष्ट राजकारण्यांना अशी शिक्षा होईल का ?
फ्रान्सचे ६६ वर्षीय माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
फ्रान्सचे ६६ वर्षीय माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
जर राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार आले, तर इमाम आणि मौलवी यांचे मानधन वाढवण्यात येईल, असे आश्वासन तृणूमल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांनी एका मशिदीमध्ये निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी दिले.
हिंदू आरोप करतात की, मुसलमान त्यांची लोकसंख्या वाढवून भारतावर नियंत्रण मिळवू इच्छितात; मात्र मुसलमान कधीही हिंदूंच्या लोकसंख्येच्या पुढे जाऊ शकणार नाहीत, असा दावा निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त कुरेशी यांनी केला.
देहली दंगलीच्या प्रकरणी राज्यातील आम आदमी पक्षाचे सरकार आणि ‘खालसा’ या संघटनेने मुसलमान पीडितांना पुरेपूर साहाय्य केले, तर पीडित हिंदूंना साहाय्य देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले.
मे मासामध्ये होणार्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने चर्चशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील कुठल्याही उमेदवाराची उमेदवारी अंतिम करू नये, अशी चेतावणी केरळमधील सायरो-मलबार चर्चने दिली आहे.
अलप्पुझा (केरळ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत संघाचे नंदू कृष्णा नामक स्वयंसेवक ठार झाले.
गलवान खोर्यातील संघर्षानंतरच्या ८ मासांत भारतियांकडून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याऐवजी त्यांची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून उघड झाले आहे.
आयकर विभागाने मध्यप्रदेशातील बैतूल येथील काँग्रेसचे आमदार निलय डागा यांच्या सोया उत्पादन करणार्या आस्थापनातील गैरव्यवहारावरून डागा आणि कुटुंबीय यांच्या २२ ठिकाणांवर धाडी घालून ४५० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त केली.
झारखंडमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून ‘जन आक्रोश सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करण्यात आले, तेव्हा मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.
केरळच्या तेनिपलम् शहरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने मोपला हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ती घटना साजरी करण्यासाठी मिरवणूक काढली होती. या हत्याकांडामध्ये धर्मांधांनी सहस्रो हिंदूंचा नरसंहार केला होता.