राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित

  • दोषी अब्दुल हमीद याची फाशीची शिक्षा आणि दोष रहित

  • पुन्हा चालणार खटला

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने वर्ष १९९६ मधील राजस्थानच्या समलेटी येथील बसगाडीत झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणात वर्ष २०१९ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलेल्या डॉ. अब्दुल हमीद याची फाशीची शिक्षा आणि दोषसिद्धी रहित केली आहे. न्यायालयाने म्हटले की, खटल्याच्या वेळी त्यांना योग्य कायदेशीर साहाय्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या निष्पक्ष सुनावणीच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले.

जलद गती न्यायालयाची स्थापना करण्याचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने आता राजस्थान उच्च न्यायालयाला निर्देश दिले आहेत की, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष जलद गती न्यायालय स्थापन केले जावे. हे न्यायालय सर्व पुराव्यांचे नव्याने आणि स्वतंत्रपणे मूल्यमापन करून पुन्हा खटला चालवेल.

वर्ष १९९६ मध्ये उत्तरप्रदेशातील आगरा येथून राजस्थानच्या बिकानेरला जाणार्‍या एका बसमध्ये राजस्थानच्या समलेटी गावाजवळ बाँबस्फोट झाला होता. या स्फोटात १४ जण ठार आणि ३७ जण घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

चक्रावणारा न्याय !