संपूर्ण देशभरात असे करायला हवे !

उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्‍या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवले, तर ७ सहस्र भोंग्यांचा आवाज न्यून केला. यात मशिदींची संख्या सर्वाधिक आहे.

बिहार सरकारचा हिंदुद्रोह जाणा !

बिहार सरकारने शाळांना देण्यात येणार्‍या महाशिवरात्री, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, भाऊबीज आदी सणांची सुटी रहित केली आहे, तर दिवाळी आणि छठपूजा यांच्या सुट्या अल्प केल्या आहेत. दुसरीकडे ईद, बकरी ईद आणि मोहरम यांच्या सुट्या वाढवल्या आहेत.

देशातील सर्वच कारागृहांमध्ये असे करा !

उत्तरप्रदेशातील कारागृहात असणारे बंदीवान रामायणातील सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे पठण करू लागले आहेत.

अशांना फाशीची शिक्षा होणारा कायदा करायला हवा !

वलसाड (गुजरात) येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी (वय ३४ वर्षे) याला श्री गणेशाविषयी अश्लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

असा संघटितपणा सर्वत्रच्या हिंदूंमध्ये हवा !

कायदा धाब्यावर बसून कर्णकर्कश डी.जे.च्या आवाजात रात्री उशिरापर्यंत उरूसाच्या निमित्ताने मिरवणूक काढणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या विरोधात २४ नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी येथे शेकडो हिंदू रस्त्यावर उतरले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

हिंदूंनो, तुम्हाला मिळणार ठेंगा !

तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर मुसलमान युवकांसाठी स्वतंत्र ‘आयटी पार्ट’ उभारण्याची घोषणा केली. ‘आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी १२ सहस्र कोटी रुपये खर्च केले आहेत’, असेही ते म्हणाले.

खलिस्तानी पन्नू याला अमेरिका भारताच्या कह्यात कधी देणार ?

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उघळून लावला होता. या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिली होती, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

अशा घटनांविषयी पुरो(गामी) तोंड उघडत नाहीत !

कर्नाटकातील दावणगिरे येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवल्या जाणार्‍या डॉन बॉस्को शाळेत हिंदु मुलांना गोमांस खायला दिले जाते, अशी धक्कादायक माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दिली.

भारतातील निवडणुकांची लज्‍जास्‍पद स्‍थिती !

राजस्‍थान, मिझोराम, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या ५ राज्‍यांतील विधानसभांच्‍या निवडणुकांच्‍या कालावधीत आतापर्यंत १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ, रोख रक्‍कम आणि महागडे धातू जप्‍त करण्‍यात आले आहेत.

नेपाळ सरकारचा राष्‍ट्रप्रेमी निर्णय जाणा !

नेपाळ सरकारने ‘इज्‍तिमा’ हा मुसलमानांचा वार्षिक धार्मिक कार्यक्रम रहित करण्‍यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमाच्‍या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते येणार होते, ज्‍यांना भारतासह अनेक देशांनी त्‍यांच्‍या देशात येण्‍यास बंदी घातलेली आहे.