डोंबिवली येथील आयसीआयसीआय अधिकोषातील चोरी प्रकरणी तिघांना अटक !

डोंबिवली येथील ‘आयसीआयसीआय’ अधिकोषाच्या एका शाखेमधून १२ कोटी २० लाख रुपयांची चोरी झाली. या प्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे शोध कक्षाने इसरार कुरेशी , शमशाद खान आणि अनुज गिरी या तिघांना अटक केली आहे.

पन्हाळगडावर (जिल्हा कोल्हापूर) हुल्लडबाजांकडून ३० सहस्र रुपयांचा दंड वसूल !

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवर लीन होऊन, तसेच काहीतरी शिकण्याच्या आणि अनुभवण्याच्या भूमिकेतून जाणे अपेक्षित आहे. आपल्या इतिहासाविषयी अभिमान निर्माण न झाल्यामुळेच युवा पिढी केवळ मौजमजा करण्यासाठी गड-दुर्गांवर जाते, हे लक्षात घ्या !

‘टोल’ चालू करण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी गज उघडे पडले !

पाटोदा-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील चुंबळी ते मांजरसुंबा १६६ कोटी रुपये व्यय करून केलेल्या ३३ किलोमीटरच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे  झाल्याने महामार्गावरील लोखंडी गज उघडे पडले आहेत. अद्याप या रस्त्यावर ‘टोल’ही चालू करण्यात आलेला नाही, त्यापूर्वीच ही दुर्दशा झाली आहे.

वायफणा (जिल्हा नांदेड) येथील कृष्ण मंदिरात पुजारी आणि ग्रामस्थ यांना घायाळ करून दानपेटीची चोरी !

चोरट्यांनी वायफणा येथील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी किशन जमजळ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांच्याकडील रक्कम आणि मंदिरातील दानपेटी चोरून पलायन केले.

पुणे येथील महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या देवतांच्या मूर्तींचे विधीवत् विसर्जन !

केडगाव येथील ‘सुभाष बाबुराव कुल महाविद्यालया’च्या परिसरामध्ये काही देवतांच्या मूर्ती, वीरगळ (वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो.

सारसोळे येथील धर्माभिमानी कैलास पाटील यांना पितृशोक !

श्री. कैलास पाटील यांनी वडिलांकडून धर्मकार्य करण्याची प्रेरणा घेऊन आता ते हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या उपक्रमांना साहाय्य करत आहेत.

बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !

अन्य एका भाकितात त्या म्हणाल्या होत्या की, वर्ष २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह परग्रहवासियांकडून (‘एलियन्स’कडून) पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे ‘एलियन्स’ पृथ्वीवरील लोकांवर आक्रमण करू शकतात.

येत्या २ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता !

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचे सदस्यत्व रहित व्हावे, यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन १-२ दिवसांमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या ! – सुनील मोदी, शिवसेना

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या होय, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी आणि समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पत्रकर परिषदेत केला.

‘गूगल मॅप्स’कडून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर !

आता ‘गूगल मॅप्स’वर ‘औरंगाबाद’ असे शोधले असता मराठीत औरंगाबाद आणि इंग्रजीत ‘संभाजीनगर’, तर ‘उस्मानाबाद’ असे शोधले असता मराठीत उस्मानाबाद अन् इंग्रजीत ‘धाराशिव’ असा उल्लेख आढळतो.