
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचे सदस्यत्व रहित व्हावे, यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन १-२ दिवसांमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असल्यामुळे राज्यात सरकार स्थापन होऊन २ आठवडे झाले, तरी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदांचीच शपथ झाली आहे; परंतु विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आल्याने काही मंत्र्यांचा शपथविधी घेण्यात येणार आहे.
सातारा येथील महिमानगड होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’ !
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !