
मुंबई – १३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर १४ जानेवारी या दिवशी मतदारांना घरी जाऊन भेटू शकतो, असे नवीन परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. मतदारांना भेटतांना पत्रकांचे वाटप करता येणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे. कदाचित पैशांचे वाटप करता येईल, असे निवडणूक आयोगाला सांगायचे आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही सवलत का देण्यात आली नव्हती आणि आता का देण्यात आली आहे ? अशा प्रकारे नियम का आणले जात आहेत ? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘पाडू’ यंत्राचा उपयोग करण्याविषयी राजकीय पक्षांना आधी का सांगण्यात आले नाही ? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !