Pandit DhirendraKrishna Shastri : हिंदू संघटित झाले नाहीत, तर भारतातही बांगलादेशासारखी स्थिती येईल !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हिंदूंना चेतावणी

वर्तुळात पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

भिलाई (छत्तीसगड) – जर हिंदूंना भारतात बांगलादेशासारखी परिस्थिती पहायची नसेल, तर आताच त्यांनी एकत्र येण्याची योग्य वेळ आहे. जर हिंदू एकत्र आले नाहीत, तर बांगलादेशात जे घडते आहे, ते भारतातील प्रत्येक रस्त्यावर घडतांना दिसेल, अशी चेतावणी मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदूंना दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की,

बांगलादेशात जे घडले, ते चांगले नव्हते; परंतु हिंदूंनी दाखवलेल्या एकतेविषयी त्यांचे कौतुक करावे लागेल. धर्मांतर आणि धर्मावर आधारित हिंसाचार, हे भारतात कर्करोगापेक्षाही धोकादायक आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि संस्कृती यांसाठी हा सर्वांत मोठा धोका आहे.

संपादकीय भूमिका

भारतात काही प्रमाणात बांगलादेशासारखीच स्थिती अनेक ठिकाणी नेहमीच दिसून येत असते आणि हिंदु निष्क्रीयच रहातात. त्यामुळे हिंदूंच्या स्थितीला तेच स्वतःच उत्तरदायी आहेत !