Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंच्या जन्मदरात घट होत राहिली, तर १२ वर्षांत हिंदू अल्पसंख्य होतील ! – डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज नेटवर्क’

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

उद्बोधन सत्र : सनातन कार्यदर्शन

डॉ. सुरेश चव्हाणके

भारत मंडपम्, देहली – आपण एकीकडे रामराज्य किंवा सनातन राष्ट्राचा शंखनाद करत आहोत; पण हे राष्ट्र किती काळ टिकेल ? हा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. हिंदूंच्या विरोधातील लढाई समोरून नाही, तर पाठीमागून लढली जात आहे. हिंदु शस्त्रांच्या लढाईत कधीच मागे राहिले नाहीत; पण वैचारिक लढाईत नेहमी मागास राहिले आहेत. ‘हम दो हमारे दो’, ही केवळ एक घोषणा होती; पण हिंदूंनी ती वेदमंत्राप्रमाणे मानली. याउलट धर्मांधांनी ४ पत्नी आणि १०-१० मुले ही मानसिकता चालू ठेवली. त्यामुळे हिंदू भलेही शस्त्रांच्या लढाईत विजयी ठरले, तरी लोकसंख्येच्या लढाईत मागे राहिले आहेत. असेच चालू राहिले, तर काही वर्षांत या देशाला इस्लामी बनण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. लोकशाहीत बुद्धीमत्ता किंवा देशभक्ती मोजली जात नाही, तर लोकसंख्या मोजली जाते. ‘तुम्ही सांभाळू शकता, तेवढी मुले जन्माला झाला’, असा कुटुंब नियोजनाचा अर्थ आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी अधिकाधिक मुले जन्माला घातली पाहिजे. अन्यथा हिंदूंच्या जन्मदरात घट होत राहिली आणि मुसलमानांचा जन्मदर वाढत राहिला, तर येत्या १२ वर्षांत हिंदू अल्पसंख्य होईल. त्यामुळे देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा त्वरीत लागू झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी ‘सुदर्शन न्यूज नेटवर्क’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी ‘लोकसंख्येचे असंतुलन : समस्या आणि उपाय’ या विषयावर बोलतांना केले.