
सांगली, १ डिसेंबर (वार्ता.) – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५ लाख ३६ सहस्र खातेदारांची खाती रि-केवायसी (ग्राहकाला जाणून घेण्याच्या प्रक्रियेचे नुतनीकरण) अभावी गोठवण्यात आली होती. यांपैकी ६५ सहस्र ६९८ खातेदारांनी बँकेशी संपर्क साधून रि-केवायसी पूर्ण केली आहे. अद्यापही अनुमाने ५ लाख ३५ सहस्र खातेदारांनी रि-केवायसी न केल्याने त्यांची खाती गोठवलेलीच आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेने रि-केवायसी नसलेल्या ५ लाख ३६ सहस्र खात्यांवर निर्बंध लागू केले. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेने खातेदारांना वारंवार रि-केवायसी करण्याचे आवाहन केले होते; मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला रि-केवायसी पूर्ण न करणार्या खात्यांविषयी दंडात्मक कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. राज्यातील अन्य बँकांवर अशा कारवाया झाल्याने जिल्हा बँक प्रशासनाने ५ लाख ३६ सहस्र खातेदारांना संदेश पाठवून त्वरित रि-केवायसी करण्याचे आवाहन केले.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अनधिकृत मशिदीच्या विरोधात लढणार्या कोष्टी कुटुंबाला धर्मांधांकडून जिवे मारण्याची धमकी !