
चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेत विद्ध्वंस घडवल्यानंतर ‘दितवाह’ चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे. जवळची भारतीय राज्ये तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पुद्दुचेरी यांच्या किनारी भागांत जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस चालू आहे. यामुळे चेन्नईहून ५४ विमानांची उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. पुद्दुचेरी केंद्रीय विश्वविद्यालयाने चक्रीवादळामुळे २९ नोव्हेंबरला सुटी घोषित करून सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुद्दुचेरी, कराईकल, माहे आणि यनम येथील सर्व शाळा अन् महाविद्यालये पुढील २-३ दिवस बंद रहातील.
श्रीलंकेत चक्रीवादळामुळे हाहा:कार !
श्रीलंकेत ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे आलेला पूर आणि भूस्खलन यांमुळे १२३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. गेल्या ३ दिवसांपासून कोलंबो विमानतळावर ३०० भारतीय प्रवासी अडकले आहेत. हे सर्व दुबईहून श्रीलंकामार्गे भारतात येणार होते.
वारसांना बँकेकडून २३.८४ लाख रुपयांचा विमा लाभ
प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील हवामानाचे अनुमान समजणार !
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी ‘लिट्टे’चा प्रमुख प्रभाकरन् याला वाहिली श्रद्धांजली
Tamil Nadu Fraud Voting : भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्राद्वारे तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदान : २५ परदेशी नागरिकांना अटक
जत (सांगली) : मुसळधार पावसामुळे मंदिराची भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू !
Buddhist Monk Pallegama : श्रीलंकेतील सर्वांत प्रभावशाली बौद्ध भिक्षू पललेगामा यांना ११ वर्षीय मुलीच्या लैंगिक शोषणावरून अटक