
कोल्हापूर, १२ जुलै (वार्ता.) – गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी अशा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर दर्शनाखाली खुले झाले आहे. कोल्हापूर येथे राजाराम बंधार्याजवळ पंचगंगा नदीची पाणीपातळी केवळ १५ फूट नोंदवली गेली. पाण्याखाली गेलेले बहुतांश बंधारे खुले झाले असून आता केवळ ९ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील बंद झालेले बहुतांश एस्.टी.चे मार्गही खुले झाले असून बहुतांश ठिकाणची बसवाहतूक सुरळीत झाली आहे.
राधानगरी धरणात ८.३६ टी.एम्.सी. पाणीसाठा असून वारणा धरणात ३४.४० टी.एम्.सी. पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व लघुप्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे.
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्या पोलिसाला अटक
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेच्या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना तातडीने साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश