
‘सप्टेंबर २०२५ मध्ये माझी दुसरी मुलगी आमचा ३ वर्षांचा नातू ‘केशव’ याच्या समवेत आमच्याकडे आली होती. मी त्याला अंघोळ घालतांना आणि झोपवतांना श्री मुरलीधर स्वामीगळ यांनी गायलेला त्यांच्या सुपरिचित धूनमधील ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।’, हा महामंत्र म्हणत असे. केशवही माझ्या समवेत गात असे. २६.१०.२०२५ या दिवशी आम्हाला पुढील संदेश मिळाला, ‘सप्तर्षींच्या जीवनाडीपट्टीच्या वाचनानुसार सर्व साधकांनी प्रतिदिन १०८ वेळा ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।’, हा महामंत्र म्हणायचा आहे.’ ‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) पूर्वसूचना देऊन माझ्याकडून या महामंत्राचा जप पूर्वीपासून करवून घेतला’, हे माझ्या लक्षात आले आणि माझा भाव जागृत झाला. सप्तर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानंतर मला या महामंत्राचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला आणि मला तो भावपूर्णरित्या म्हणता येऊ लागला.

हा महामंत्र म्हणतांना मला पुढीलप्रमाणे चार वेगवेगळे भाव जाणवले. ‘हरे राम हरे राम’, असे म्हणतांना ‘मी भगवान श्रीरामाला मनःपूर्वक हाक मारत आहे’, असा माझा भाव असतो. ‘राम राम हरे हरे’, असे म्हणतांना ‘मी भगवान श्रीरामाची विनवणी करत आहे’, असा माझा भाव असतो. ‘हरे कृष्ण हरे कृष्ण’, असे म्हणतांना ‘भगवान प्रत्येकाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे’, याबद्दल माझ्या मनात अपार कृतज्ञतेचा भाव असतो. ‘कृष्ण कृष्ण हरे हरे’, असे म्हणतांना ‘भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमली संपूर्णपणे शरण गेले आहे’, असा माझा भाव असतो.
‘हे भगवंता, हे परात्पर गुरुदेवा, आम्ही त्रेतायुगातील भगवान श्रीरामाला आणि द्वापरयुगातील भगवान श्रीकृष्णाला पाहिले नाही; परंतु आम्ही तुम्हाला राम आणि कृष्ण या रूपांत पाहिले आहे. (सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या या पूर्वी झालेल्या एका जन्मोत्सवाच्या वेळी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपांत (वेशभूषेत) साधकांना दर्शन दिले होते.) ते पाहून आमच्या जीवनाचे सार्थक झाले. हे भगवंता, आमच्यासाठी तुम्हीच सर्वस्व आहात. आपल्या श्रीचरणी मी संपूर्ण शरणागतभावाने नमस्कार करत आहे.’
– (पू.) सौ. उमा रवीचंद्रन् (७० व्या समष्टी संत, वय ६० वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (२.११.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !