
१. श्री. प्रशांत प्रकाश रामदासी, बार्शी, जि. सोलापूर : ‘उत्तम ईश्वरी अनुभूती देणारा अनुभव ! ईश्वरप्राप्तीसाठी लागणार्या इच्छाशक्तीमध्ये उत्साह जाणवला.’
२. श्री. संदीप चंद्रकांत जोशी, बाळे, जि. सोलापूर : ‘आश्रमात आल्यावर ‘देवळात आल्यासारखे जाणवले.’
३. श्री. अमर दिलीप पुराणिक, निगडी, कोरेगाव, जि. सातारा : ‘धर्मजागृतीसाठी आपल्या आश्रमाकडून जे कार्य चालू आहे, ते आम्हाला इथे आल्यानंतर पहावयास मिळाले. ते अतिशय छान आहे, स्वत:ही धर्मकार्यात काहीतरी स्तुत्य कार्य करावे ही जागृती झाली. ’
४. श्री. ऋषभ उल्हास पुराणिक, कोरेगाव, जि. सातारा : ‘आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तम अशी सात्त्विक अनुभूती अनुभवण्यास मिळाली. आश्रमामुळे माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नक्कीच साहाय्य होईल.’
५. श्री. धर्मराज प्रकाश जोशी, कोरेगाव, जि. सातारा : ‘आश्रमात आल्यानंतर ‘हिंदु धर्म’ जपणे आणि त्याची जनजागृती कशी होऊ शकते’, हे पहाण्यास मिळाले. ‘ईश्वरीय अनुभूती म्हणजे काय ?’, याचे साक्षात् दर्शन झाले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २२.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !