विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मृतांच्या नातेवाइकांची उच्च न्यायालयात याचिका !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंह

मुंबई – वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोटात मृत्यू पावलेल्या ६ जणांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. विशेष न्यायालयाने ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले, ज्यांमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. त्या निर्णयाविरोधात ९ सप्टेंबरला निसार अहमद सय्यद बिलाल आणि इतर ५ जणांनी त्यांचे अधिवक्ता मतीन शेख यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट केली आहे. याद्वारे विशेष न्यायालयाचा निर्णय रहित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.