Bangladesh Rohingya Refugees : रोहिंग्या निर्वासितांना पोसणे आम्हाला कठीण होत आहे !

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी जगाकडे मागितले साहाय्य !

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – निर्वासित रोहिंग्यांमुळे बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावर दबाव वाढला आहे. देशात १३ लाखांहून अधिक रोहिंग्या आहेत. त्यांना अन्न पुरवणे कठीण होत आहे. बांगलादेशासह जगासाठी हे एक मोठे आव्हान आहे. जगाने या विषयावर एकत्र येऊन रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या घरी परतण्यास साहाय्य करावे, असे आवाहन बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी केले.

ऑगस्ट २०१७ पासून म्यानमारमध्ये चालू असलेल्या हिंसाचारानंतर रोहिंग्यांनी पलायन करून बांगलादेशात आश्रय घेतला. बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यात त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. युनूस यांनी रोहिंग्यांच्या परतीसाठी ७ कलमी योजनाही सादर केली.

रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत जायचे आहे !

कॉक्स बाजारमध्ये रहाणार्‍या रोहिंग्यांनी ‘रोहिंग्या नरसंहार स्मृतिदिन’ साजरा केला. त्यांच्या हातात घरी परतण्याची मागणी करणारे फलक होते. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

  • आता भारतानेही देशातील कोट्यवधी घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचे सूत्र जागतिक पातळीवर उपस्थित केले पाहिजे आणि त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत !
  • कोट्यवधी बांगलादेशी घुसखोरांना भारत गेली अनेक वर्षे पोसत आहे. त्यात प्रतिदिन घुसखोरांची भर पडतच आहे, तर केवळ १३ लाख रोहिंग्यांमुळेच बांगलादेश त्रस्त झाला आहे. यातून भारतावर किती ताण पडत असेल, याची कल्पनाच करता येत नाही !