शेतकर्‍याची पाण्यात उडी मारून आत्महत्या !

बुलढाणा येथे भूमीच्या मोबदल्यासाठीचे आंदोलन

प्रतिकात्मक छायाचित्र

बुलढाणा – जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या भूमीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन चालू होते; मात्र १५ ऑगस्टला केलेल्या आंदोलनाच्या वेळी विनोद पवार या शेतकर्‍याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकर्‍याला जीव गमवावा लागला. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, ही अतिशय दुःखद, लज्जास्पद आणि संतापजनक घटना आहे. मृत विनोद पवार यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करायला हवे. आता तरी सरकारला जाग येणार का ?