
दोन पैसे हातात घेऊन आणि स्वतःला मोठे समजून एखाद्या भिकार्याला म्हणू नका, ‘अरे भिकार्या, घे दोन पैसे.’ उलटपक्षी तुमच्यासमोर तो गरीब माणूस उभा आहे, याविषयी कृतज्ञता बाळगा; कारण त्याला दान दिल्याने स्वतःचीच उन्नती आणि स्वतःचाच विकास करून घेण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली असते. दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !