‘इ.व्ही.एम्.’वर आक्षेप घेणारे ‘व्होट जिहाद’विषयी गप्प का ! – मंत्री नीतेश राणे

मंत्री नीतेश राणे

मुंबई, ११ ऑगस्ट (वार्ता.) – लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोहल्ल्यात ९० टक्के मतदान महाविकास आघाडीला करण्यात आले. मौलवींनी महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले. लोकसभेत महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागा ‘व्होट जिहाद’मुळे जिंकल्या. ‘इ.व्ही.एम्.’ वर आक्षेप घेणारे ‘व्होट जिहाद’विषयी गप्प का ? असा प्रश्न महाराष्ट्राचे मत्सव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी ११ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.